• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

शम्मी : कहाँ हो तुम जरा आवाज दो...

शम्मीनं आपली कारकीर्द छोट्या छोट्या भूमिका करत पुढे नेली. तिने कधी तक्रार केली नाही. आयुष्यातील कठीण प्रसंगी अंगावरच्या प्रसंगी घरातून बाहेर पडून परत आपली कारकीर्द उभी करून दाखवली. जिद्दीनं शांतपणे आपल्या वाट्याला आलेली भूमिका निभावली. नायिकेची नसली तरी नंतर सहनायिकेची, त्यानंतर चरित्र नायिकेची आणि शेवटी शेवटी खट्याळ म्हातारीची भूमिका तिनं मन:पूर्वक रंगवली.......

  • आफताब परभनवी
  • Sat , 10 March 2018
  • 0 Comments
  • 2 Like

प्रेमगीतांतून कलेकलेनं उमलत गेलेला ‘शशी कपूर’

त्याचं वय झालं होतं. तो आजारी होता. तो जाणारच होता. पण गेला तेव्हा ‘मॅटनी शो’ची दुपार उदास करून गेला. मुंबईला या काळात कधी पाऊस पडत नाही. पण त्या दिवशी सर्वत्रच उदास ढग दाटून आले होते. पाऊसही कोसळलायला लागला होता. रवीच लोपला तेव्हा शशी दिसायचं, काही कारणच नव्हतं. शशी कपूर वयाच्या ७९ व्या वर्षी पंचत्वात विलीन झाला.......

  • आफताब परभनवी
  • Sat , 09 December 2017
  • 0 Comments
  • 3 Like

ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांतील ‘श्यामा’ नावाचं रंगीत स्वप्न

पुढे श्यामाचे चित्रपट येत गेले, पण त्यात तिच्या भूमिका दुय्यम होत्या. शिवाय गाणीही लक्षात राहावी अशी नव्हती. पुढे चित्रपट रंगीत झाला (जबकही रंगीत होता), नवीन तरुण नायिका आल्या आणि जुन्यांची सद्दी संपली.  गुरुदत्तच्या ‘आरपार’मधून श्यामा आणि शकिला दोघीही साधारणत: एकदाच प्रकाशात आल्या. काय विलक्षण योगायोग! दोघीनींही या जगाचा निरोपही सोबतच घेतला.......

  • आफताब परभनवी
  • Sat , 18 November 2017
  • 1 Comments
  • 2 Like

सौ बार जनम लेंगे, ‘शकिला’ तूमको न भूल पायेंगे

शकिला गेली, पण कुणी तिची फारशी दखलही घेतली नाही. नविन पिढीला तर शकिला म्हणजे कोण हेच कळणार नाही. पण जर ‘बाबूजी धीरे चलना’चा उल्लेख केला तर सर्वांनाच हे गाणं आठवेल. १९४९ ते १९६३ इतकी छोटी १४ वर्षांची तिची कारकीर्द. जेमतेम ४८ हिंदी चित्रपट. पहिली पाच वर्षं तिचे चित्रपट दुर्लक्षित राहिले. ती प्रकाशात आली पहिल्यांदा गुरुदत्तच्या ‘आरपार’ (१९५४) मध्ये. या चित्रपटातील तिची दोन्ही गाणी अतिशय गाजली.......

  • आफताब परभनवी
  • Wed , 27 September 2017
  • 0 Comments
  • 3 Like

जॉनी वॉकरचा चेहरा, रफीचा गळा आणि गुरुदत्तचा मेंदू

गुरुदत्तला सावलीसारखा सोबत होता, बद्रुद्दीन जमालोद्दीन काजी. पहिल्याच सिनेमातगुरुदत्तनं त्याला नाव दिलं, जे पुढे अतिशय लोकप्रिय ठरलं. इतकं की त्याचं मूळ नावच विसरलं गेलं. ते नाव होतं- ‘जॉनी वॉकर’. जॉनी वॉकर हा गुरुदत्तच्या चित्रपटाचा अभिन्न हिस्सा बनला. पहिले तीन सिनेमे झाल्यावर पुढच्या सिनेमात त्याला गाणं मिळालं. त्याची लोकप्रियता पाहून, पुढे त्याच्यासाठी सिनेमात किमान एक तरी गाणं हवंच अशी सक्तीच निर्माण झाली.......

  • आफताब परभनवी
  • Sat , 29 July 2017
  • 1 Comments
  • 3 Like

बिमलदा-मन्नादा : तीन रंगी इंद्रधनुष्य

बिमल रॉय यांनी आपल्या चित्रपटांत बंगाली संगीत आणि त्यातही परत विशेषत: बाऊल संगीत, रविंद्र संगीत यांचा वापर मन्ना डेच्या आवाजात करून घेतला. हा वापर त्यांच्या गाण्यांचे एक वैशिष्ट्य बनून राहिला आहे. भक्तीरंग-देशप्रेम-लोकसंगीत असे तीन रंग मन्ना डेच्या आवाजात बिमल रॉय यांच्या चित्रपटात दिसतात. बिमल रॉय यांना जाऊन ५० वर्षे उलटली. मन्नादांची जन्मशताब्दी पुढच्या वर्षी सुरू होते आहे.......

  • आफताब परभनवी
  • Sat , 22 July 2017
  • 0 Comments
  • 2 Like

सुमिता सन्याल, तेरे बिना जिया लागे ना!

‘ना जिया लागे ना’ हे ‘आनंद’ चित्रपटातील नितांतसुंदर गाणं जिच्या तोंडी आहे ती नायिका हिंदी रसिकांना फारशी परिचित नव्हती. ती म्हणजे बंगाली अभिनेत्री सुमिता संन्याल (जन्म ९ ऑक्टोबर १९४५). तिचं परवा, ९ जुलैला वयाच्या ७१ व्या वर्षी कोलकात्यात हृदयविकारानं निधन झालं. सुमिताच्या वाट्याला तीनच हिंदी गाणी आली. ‘ना जिया लागे ना’सारख्या गाण्यांनी रसिकांच्या मनात तिला कायमस्वरूपी स्थान मिळालं.......

  • आफताब परभनवी
  • Sat , 15 July 2017
  • 0 Comments
  • 1 Like

गीतासाठी गाणारी गीता, सोबत देव आनंद : एक भन्नाट कॉकटेल!

एक खट्याळ गीता (बाली) घ्यायची, दुसऱ्या अवखळ गीता (दत्त) चा कोवळा मस्तीवाला आवाज घ्यायचा, एक देखणा देव आनंद घ्यायचा, एकदम ताज्या तरुण रक्ताचा गुरुदत्त नावाचा दिग्दर्शक घ्यायचा, एकदम नवीन कोरं करकरीत पार्श्वसंगीत वापरायचं आणि आपल्याच लिखाणाच्या मस्तीत बुडालेल्या साहिरचे शब्द घ्यायचे.......

  • आफताब परभनवी
  • Sat , 08 July 2017
  • 0 Comments
  • 2 Like

कृष्णधवल गाण्यांतली पंचमदांची ‘रंगीत’ जादू

इतकी वर्षं उलटून गेली. पंचमच्या विविध गाण्यांची चर्चा होत राहते, पण त्याच्या सुरुवातीच्या गाण्यांवर फारसं बोललं जात नाही. म्हणून ही एक ‘भुली हुई यादें’ अशी आठवण... २७ जून हा पंचमचा (आर. डी. बर्मन) जन्मदिवस. त्याची आठवण काढताना नेहमी ‘तिसरी मंझिल’पासून सुरुवात केली जाते. पण त्याच्याबरोबर/आधी पंचमचे जे पाच कृष्णधवल चित्रपट प्रदर्शित झाले, त्यातील गाण्यांचा फारसा उल्लेख होत नाही.......

  • आफताब परभनवी
  • Sat , 01 July 2017
  • 1 Comments
  • 2 Like

‘पाऊस’च, पण ‘त्याच्या’ आवाजातला, नजरेतला, गाण्यातला!

लताच्या आवाजात नितळ पाऊस अनुभवता येतो, गीताच्या आवाजात पावसाची मादकता जाणवते, शास्त्रीय संगीताचा आधार घेतलेली गाणी आलापीसारखी नाजूक वळण घेऊन मनाच्या कठड्यावर अलगद येऊन बसतात. पण पुरुष गायकांच्या आवाजात एक वेगळाच पाऊस हिंदी चित्रपटगीतांत उतरला आहे. हा पाऊस प्रेमाची याचना करणारा आहे, विरहात पोळलेला आहे, संहारक घनगंभीर आहे, प्रेमात पूर्ण रसरसून उपभोग घेणारा आहे.......

  • आफताब परभनवी
  • Sat , 24 June 2017
  • 0 Comments
  • 1 Like

जुन्या गाण्यात सतत ‘नूतन’ वाटणारी नूतन

अजिंठ्याच्या अलिकडे मुख्य रस्त्यापासून उजवीकडे जरा आत वळलं की, अन्व्याचं मंदिर सापडतं. त्यावरची अप्रतिम शिल्पकला पाहून आपण स्तिमित होऊन जातो. तसंच नूतनच्या लोकप्रिय चित्रपटांची वाट सोडून आडवाटेला वळलं की, काही गोड गाणी हाताला लागतात. लोकप्रिय संगीतकार वगळून इतर संगीतकारांकडे लक्ष जातं. आणि त्या गाण्यांची अवीट गोडी जाणवते. .......

  • आफताब परभनवी
  • Sat , 17 June 2017
  • 0 Comments
  • 2 Like

गीताच्या घनगर्द आवाजातील मदभरी काली घटा

लताच्या आवाजात पाण्याचा नितळपणा अनुभवायला येतो. गीतानं आपल्या आवाजात पावसाची मादकता-शृंगार आणला आहे. उच्छृंखल न होता शृंगाराचं सौंदर्य प्रकट करण्याची अफलातून ताकद तिच्या आवाजात आहे. हे पहिल्यांदा ओळखलं सचिन देव बर्मन यांनी. ‘बाजी’ (१९५१) हा गीताच्या आवाजाला खऱ्या अर्थानं ‘ब्रेक’ देणारा सिनेमा. पडद्यावर गीताबालीसारखा खट्याळ चेहरा. एस.डी.बर्मनचं अतिशय वेगळं असं संगीत.......

  • आफताब परभनवी
  • Sat , 10 June 2017
  • 0 Comments
  • 2 Like

प्रेरणा शास्त्रीय संगीताची, चेहरा स्वत:चा आणि मुक्काम हिंदी चित्रपटांत!

रागांवर आधारित बरीच गाणी हिंदी सिनेमांत आली आहेत. पावसाची पण खूप सुंदर गाणी रागांवर आधारित आहेत. पण शास्त्रीय संगीताचा बाज कायम ठेवून चित्रपटातही तसाच प्रसंग निर्माण करून आलेली गाणी फार थोडी आहेत. मूळ शास्त्रीय संगीतापासून प्रेरणा घेऊन पावसाची गाणी स्वत:चा चेहरा घेऊन हिंदी चित्रपटांत अवतरली. पण नंतरच्या काळात त्यातील गोडवा हरवला आणि ‘आज रपट जाईयो’ म्हणत ती कानावर आदळायला लागली!.......

  • आफताब परभनवी
  • Sat , 03 June 2017
  • 0 Comments
  • 4 Like

उमड घुमड कर आयी रे घटा!

जिथे प्रेमाची आसक्ती आहे, तिथेच पाऊस बरसतो अशी एक ओळ भरत व्यास लिहून जातो. ‘सावन का संदेशा लेकर निकली अपने घरसे, जो कोई इसके प्यार को तरसे वही नवेली बरसे’. भरत व्यास यांनी एक सनातन सत्य या निमित्ताने लिहून ठेवले आहे. विफल प्रेमाचे प्रतीक म्हणजे पाऊस नाही. पाऊस हा सफल प्रेमाचे प्रतिक आहे. ज्याला त्याची आस आहे तिथेच तो बरसतो आहे. आणि त्यातूनच नवीन निर्माण होते, सृजन होते........

  • आफताब परभनवी
  • Sat , 27 May 2017
  • 0 Comments
  • 3 Like

कैफी आझमी : वक्त ने किया क्या हसी सितम!

‘उमराव जान’चे गीतकार ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त उर्दू कवी शहरयार यांना पत्रकार अंबरिश मिश्र यांनी मुलाखतीत विचारलं होतं की, तुमचा चित्रपट इतका गाजला, त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला मग निर्मात्यांची रांग लागली असेल तुमच्या दारात चित्रपटांसाठी गीतं लिहावीत म्हणून. त्याला उत्तर म्हणून शहरयार हलकेच हसून म्हणाले, ‘पता नही. मगर किसीने भी पुछा नही अभी तक.’ कैफी आझमी यांच्याबाबतही असंच काहीतरी झालं असावं. .......

  • आफताब परभनवी
  • Sat , 20 May 2017
  • 0 Comments
  • 4 Like

ना सचिनदांचं संगीत, ना किशोर-रफीचा गळा; देव आनंद जरा वेगळा

देव आनंदची पडद्यावरच्या प्रतिमेची सांगीतिक बाजू साकारण्यात सचिन देव बर्मन यांचं संगीत आणि किशोर कुमार-रफी यांचा आवाज यांचं फार मोठं योगदान आहे. पण या शिवाय इतरही संगीतकार आणि गायकांनी ही प्रतिमा सजवली. त्यातून काही गाणी लोकप्रिय-अवीट गोडीची ठरली...शैलेंद्रचे शब्द, देव आनंदचे हासरे डोळे, सुंदर वहिदा रेहमान, उसळत्या कारंज्यासारखं शंकर जयकिशनचे संगीत आणि त्यावर तलतचा थरथरचा स्वर........

  • आफताब परभनवी
  • Sat , 13 May 2017
  • 1 Comments
  • 1 Like

शैलेंद्रची गाणी, लताचा आवाज

शंकर-जयकिशन आणि सलिल चौधरी यांच्यापुरतेच फक्त शैलेंद्रचे शब्द आणि लताचे सूर यांची मोहिनी मर्यादित नव्हती. इतरही काही संगीतकारांना या जोडीचा वापर करण्याचा मोह पडला. शंकर-जयकिशन सोबतची २५ गाणी, सलिल चौधरीची ९, सचिन देव बर्मनची ५ आणि इतरांची ३ अशी तब्बल ४२ गाणी शैलेंद्र-लता या जोडीनं वेगळी अशी दिली. हा सगळा कालखंड १२ वर्षांचा आहे, याची वेगळी नोंद घेतली पाहिजे. .......

  • आफताब परभनवी
  • Sat , 06 May 2017
  • 1 Comments
  • 2 Like

सलिल-लता-शैलेंद्र : सांगितीक समभुज त्रिकोण

शंकर-जयकिशन सोबतच अजून एका संगीतकाराला शैलेंद्रच्या निसर्ग व प्रेम या भावनांना शब्दबद्ध करून लताच्या आवाजात सादर करण्याचा मोह पडला. त्या संगीतकाराचं नाव सलिल चौधरी. ‘मधुमती’प्रमाणे ‘परख’मध्येही सलिल-लता-शैलेंद्र हे त्रिकुट आहे. खरं तर ‘दो बिघा जमीन’, ‘मधुमती’, ‘परख’, ‘उसने कहा था’ या चित्रपटांना बिमल रॉय-सलिल-लता-शैलेंद्र असा सांगितीक समभूज चौकोनच म्हटलं पाहिजे........

  • आफताब परभनवी
  • Sat , 29 April 2017
  • 0 Comments
  • 2 Like

शैलेंद्र-लता-शंकर-जयकिशन : १२ वर्षं, १२ गाणी

निसर्गाच्या सान्निध्यात फुललेलं प्रेम, निसर्गाच्या सान्निध्यातच त्याची चरमसीमा आणि निसर्गाच्या सान्निध्यातच विरहाची वेदना, अशा प्रकारे प्रेमाचे रंग शैलेंद्र-लता-शंकर-जयकिशन यांनी रंगवले आहेत. एखादा कवी असा काही विचार आपल्या गाण्यात करतो आणि त्याला गायिका, संगीतकार सतत १२ वर्षं साथ देत १२ गाणी देतात हे विलक्षण आहे. लताच्या आवाजात नैसर्गिक गोडवा आहे आणि सोबत या आवाजाला प्रीतीचं अस्तरही आहे. .......

  • आफताब परभनवी
  • Sat , 22 April 2017
  • 0 Comments
  • 2 Like

ताजमहाल : शकिल बदायुनी आणि साहिर लुधियानवी यांचा!

आज ही दोन्ही गाणी ऐकत असताना ‘लीडर’मधील गाणंच उजवं वाटतं. साहिरची कविता श्रेष्ठच आहे. तुलनाच करायची तर शकिलपेक्षा साहिर जास्तच प्रतिभावंत होता, यात काही वाद नाही. पण गाणं म्हणून मनात रेंगाळतं ते शकिलचंच. कदाचित गाण्यासाठी शब्दांची जी तडजोड करावी लागते, ती साहिरने केली नसावी. साहिरच्या कवितेतील शब्द गाण्यात मावत नाहीत, त्यांचे अर्थ चटकन उलगडत नाहीत........

  • आफताब परभनवी
  • Sat , 15 April 2017
  • 0 Comments
  • 2 Like

मीनाकुमारी : ‘कितना हसी सफर था...’

जळणारी एक मेणबत्ती, तिच्या भोवती पाघळलेलं मेण किंवा काजळ भरलेल्या मोठ्या डोळ्यांतून ओघळणारे आसु अशी मीनाकुमारीची काहीतरी एक दु:खी प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली आहे. तिच्या शोकात्म आयुष्याचीही या प्रतिमेला एक पार्श्वभूमी आहे. पण हे सगळं बाजूला ठेवून तिच्या कारकिर्दीकडे तटस्थपणे पाहिलं तर कितीतरी सुंदर, आनंदी प्रेमाची रसरशीत गाणी तिच्या चित्रपटांत सापडतात........

  • आफताब परभनवी
  • Sat , 08 April 2017
  • 1 Comments
  • 2 Like

एप्रिल फुल बनाया, उनको गुस्सा आया, तो मेरा क्या कसूर, जमाने का कसूर

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला ‘खुश है जमाना, आज पहली तारीख’ हे गाणं रेडिओवर वाजतं. एक तारखेच्या पगाराच्या मानसिकतेमुळे या गाण्याची लोकप्रियता टिकून राहिली. दुसर्‍या महायुद्धानंतर जगभरात आणि भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतात शहरीकरणाचा जोर वाढत गेला. गावगाडा सोडून लोक छोट्या-मोठ्या शहरांकडे नोकरीसाठी धाव घेत होते. या सगळ्याचा परिणाम म्हणजे, एक तारीख हा फार मोठा दिवस झाला. .......

  • आफताब परभनवी
  • Sat , 01 April 2017
  • 0 Comments
  • 2 Like

एस.एन.त्रिपाठी : पौराणिकतेचा शिक्का बसलेला गुणी संगीतकार

एस.एन.त्रिपाठीसारख्या गुणी संगीतकाराचं हे दुर्दैव. पौराणिक चित्रपटाचा शिक्का त्रिपाठी यांच्यावर एकदाचा पडला आणि त्यांची प्रतिभा काहीशी उपेक्षिली गेली. त्यांना प्रचंड काम मिळालं, पण सोबतच मुख्य धारेतल्या संगीतापासून ते दूर फेकले गेले. पंचाहत्तर वर्षं जगलेल्या त्रिपाठींनी पंचाहत्तरहून अधिक चित्रपटांना (७९) संगीत दिलं. फक्त इतकंच नाही तर २७ चित्रपटांमधून अभिनय केला, १८ चित्रपटांचे दिग्दर्शन केलं........

  • आफताब परभनवी
  • Sat , 25 March 2017
  • 0 Comments
  • 2 Like

साहिर, चोप्रा आणि रवी : एक मधुर त्रिवेणी

बी.आर.चोप्रा यांनी सुरुवातीच्या जवळपास सगळ्याच चित्रपटांत गीतकार म्हणून साहिरलाच घेतलं. चोप्रांना वाटलं आपण संगीतकार शंकर जयकिशनला एखाद्या चित्रपटात संगीतासाठी बोलावावं. तशी बोलणीही झाली, पण गाडी अडून बसली गीतकारावर. चोप्रा साहिरसाठी आग्रही तर शंकर जयकिशन शैलेंद्र-हसरतला सोडायला तयार नाही. शेवटी शंकर जयकिशनने चित्रपट सोडला. आणि चोप्रांनीही दुसरा संगीतकार निवडला. .......

  • आफताब परभनवी
  • Sat , 18 March 2017
  • 0 Comments
  • 2 Like

होळीची काही अविट गाणी, पण जुन्या हिंदी चित्रपटांतील

होळी म्हणजे मस्ती असं जे समीकरण आहे, त्याला खरा न्याय देणारं एक गाणं १९६६ मध्ये ‘बिरादरी’ या चित्रपटात गुणी संगीतकार चित्रगुप्त यांनी दिलं. या गाण्याची छाप पुढे इतर होळी गीतांवरही आढळते. शशी कपूर आणि पुढे कॅबरे डान्सर म्हणून गाजलेली फरियाल यांच्यावर हे गाणं चित्रित आहे. सोबत यात मेहमूद आणि हेलनचं धम्माल नृत्यही आहे. .......

  • आफताब परभनवी
  • Sat , 11 March 2017
  • 0 Comments
  • 2 Like

थरथरत्या आवाजाचा ‘थरारून’ टाकणारा गायक!

तो कधीही खूप लोकप्रिय असा गायक नव्हता. त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धो धो पैसे कमावले नाहीत. त्याची गाणी अंताक्षरी खेळताना आठवत नाहीत. त्याच्यासाठी संगीतकार अडून बसले, नायक त्याचा आवाज हवा म्हणून हट्ट करून बसले असंही कधी घडलं नाही. सहज ओठांवर त्याची गाणी येत नाहीत. एखाद्या सायंकाळी दाटत जाणाऱ्या अंधारासोबतच व्यक्त करावं, पण व्यक्त करता येऊ नये असं काही तरी काळजात दाटत जातं.......

  • आफताब परभनवी
  • Sat , 04 March 2017
  • 0 Comments
  • 2 Like

ओ.पी. नय्यरांच्या संगीतात किशोरकुमार कुठे आहे?

किशोरच्या आवाजाचा नेमका पोत ओ.पी. नय्यर यांच्या लक्षात आला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पण हा दोष नय्यर यांचा नसून किशोरचाच असावा. कारण त्यांनी नायक म्हणून स्वत:साठीच पार्श्वगायन करण्याचा अट्टाहास चालवला होता. परिणामी त्यांच्या आवाजातील विविध शक्यता आजमावून पाहणं संगीतकारांना शक्य झालं नाही. कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीला किशोरच्या आवाजावर सैगल यांचा प्रभाव होता........

  • आफताब परभनवी
  • Sat , 25 February 2017
  • 0 Comments
  • 1 Like

याद ‘जगजीत’ (सिंग) की आये...

जगजीत १९८१सालच्या ‘साथ साथ’ या चित्रपटातून गायकीसोबत संगीतकार म्हणूनही ठळकपणे यातून पुढे आले. अर्थात हिंदी चित्रपटात ते फारसे रमले नाहीत ही बाब अलहिदा. जगजीत यांची आठवण त्यांच्या ग़ज़लांसाठी तर येत राहिलच, पण मोजक्याच चित्रपटांतील त्यांच्या प्रभावशाली ठरलेल्या संस्मरणीय गाण्यांसाठीही येत राहिल... हिंदी चित्रपट संगीताविषयीचं नवं कोरं साप्ताहिक सदर .......

  • आफताब परभनवी
  • Sat , 18 February 2017
  • 0 Comments
  • 4 Like

सुमन कल्याणपूर : न फुललेलं लोकप्रियतेचं ‘सुमन’!

सुमन कल्याणपूर यांना एकदाही फिल्मफेअर अवार्ड लाभलं नाही. त्यांचं एकही गाणं कधी लोकप्रियतेच्या शिखरावर होतं असं नाही. एखाद्या गाण्यानं किंवा मोजक्याच गाण्यानं मोठी लोकप्रियता मिळवून गायब होणारे क्षणिक का होईना त्या सुखाचा आनंद घेतात. पण सुमन यांच्यासारख्यांची नियती वेगळीच राहिली. त्यांना ना कधी प्रचंड लोकप्रियता लाभली, ना कधी या क्षेत्रातून कायमचं हद्दपार व्हावं लागलं........

  • आफताब परभनवी
  • Wed , 08 February 2017
  • 1 Comments
  • 4 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.